लव्ह जिहादचं उदात्तीकरण करणा-या केदारनाथ या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे.
महिना: एफ वाय
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ट्विटरवर ॲट सायबर दोस्त नावाचं हँडल
सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्याकरिता केंद्रीय गृह मंत्रालयानं ट्विटरवर ॲट सायबर दोस्त या नावाचं हँडल सुरू केलं आहे.
शाश्वत स्वच्छतेचा संदेश देणारी एलईडी व्हॅन फिरणार गावोगावी
संत गाडगेबाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचं जाणा तंत्र असं म्हणत जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन फिरणार असून या व्हॅनला जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला.
राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड झालेल्या ३० प्रकल्पांमध्ये ठाण्याचे सर्वाधिक म्हणजे ७ प्रकल्प
राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ७ प्रकल्पांची निवड झाली असून यामध्ये सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूलचे २ प्रकल्प असून इंडियन सायन्स काँग्रेससाठीही या शाळेच्या एका प्रकल्पाची निवड झाली आहे.
पारसिक डोंगरावरील कातळावर लेझरच्या सहाय्यानं आकर्षक रोषणाई
पारसिक चौपाटीला लागून असलेल्या विस्तीर्ण आणि नयन मनोहर अशा पारसिकच्या डोंगराचं रूप आकर्षक विद्युत रोषणाईनं मोहरणार आहे.
कळवा, मुंब्रा, दिव्यातील वीज खाजगीकरणास आमदार जितेंद्र आव्हाडांचा विरोध
कळवा, मुंब्रा, दिवा आणि आजूबाजूच्या परिसरातील वीजेच्या खाजगीकरणाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला असून कळवा, मुंब्रा, दिवा पंचक्रोशीमध्ये खाजगी वीज कंपन्यांना पाऊलही ठेवू देणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा
मराठी कामगारांना कामावरून काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
भिलारच्या धर्तीवर जिल्ह्यात देखील एखादं पुस्तकांचं गाव व्हावं – जिल्हाधिकारी
भिलारच्या धर्तीवर जिल्ह्यात देखील एखादं पुस्तकांचं गाव व्हावं अशी इच्छा असून यासाठी योग्य गाव सुचवल्यास जिल्हा प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलं आहे.
स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या १० जलतरण पटूंनी यशस्वीपणे पूर्ण केलं मोरा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर
ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् ॲकॅडमीच्या १० जलतरण पटूंनी मोरा जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे १६ किलोमीटरचं अंतर वैयक्तीकरित्या यशस्वीपणे पूर्ण करून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ठाणे पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकानं गेल्या ९ महिन्यात चोरीला गेलेले ३८ लाखांचे ३५१ मोबाईल केले हस्तगत
ठाणे पोलीसांनी चोरीला गेलेले तब्बल ५९ मोबाईल्स परत मिळवून दिले आहेत.