त्यांचा फक्त स्वतःच्या परिवारावरच विश्वास – श्रीकांत शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर आरोप

कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण हे ठरत नव्हतं. जेव्हा ठरवलं त्याच्यावर पण विश्वास नाही अशी परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. त्यांना कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर नेत्यांवर कधीच विश्वास नव्हता त्यांचा फक्त स्वतःच्या परिवारावरच विश्वास आहे असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. श्रीकांत शिंदे यांच्या निवडणूक कार्यालयाचे कल्याण पूर्वेत उद्घाटन झाले. या उद्घाटनप्रसंगी श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटासह इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. तुम्हाला पदाधिकारी कार्यकर्त्यांवर विश्वास नव्हता फक्त स्वतःच्या परिवारावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला पन्नास आमदार खासदार नगरसेवक पदाधिकारी नेते सोडून गेले असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading