संत गाडगेबाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचं जाणा तंत्र असं म्हणत जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन फिरणार असून या व्हॅनला जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव आणि उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. जिल्हा परिषद स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण या ५ तालुक्यातील दीडशे गावांमध्ये ही व्हॅन फिरणार आहे. गावातील महत्वाच्या चौकात या व्हॅनला उभं करून स्वच्छतेबाबत असलेली गाणी, जिंगल्स ऐकवली जाणार आहेत.