पालघर जिल्ह्यातील वाडा येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं स्मारक उभारलं जाणार आहे.
political
समन्वय प्रतिष्ठानतर्फे एनईईटी आणि जेईई परीक्षेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण
समन्वय प्रतिष्ठानतर्फे एनईईटी आणि जेईई परीक्षेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उध्दव ठाकरे यांच्या अचानक घेतलेल्या भेटीमुळं चर्चेला उधाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानं राजकीय क्षेत्रातल्या जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विकासक आणि प्रशासनाच्या कासव गतीमुळं ट्रक टर्मिनस अडीच वर्ष रखडलं
ठाण्यातील नियोजित ट्रक टर्मिनस हे विकासक आणि प्रशासनाच्या कासव गतीमुळं रखडलं आहे.
थीम पार्क चौकशी निव्वळ फार्स – मिलिंद पाटील
थीम पार्कच्या उभारणीतील ठेकेदार नितीन देसाई हे सत्ताधा-यांबरोबर फिरत असल्यानं चौकशीचा निव्वळ फार्स सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेच्या न झालेल्या वसुलीबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी
ठाणे महापालिकेच्या ३०० कोटीहून अधिक रक्कमेच्या न झालेल्या वसुलीबाबत सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती धर्मराज्य पक्षानं राज्याच्या नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.
ठाण्यातील १६८ शिक्षकांच्या मान्यतेचा तिढा सुटल्यामुळे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा
ठाण्यातील १६८ शिक्षकांच्या मान्यतेचा तिढा सुटल्यामुळे या शिक्षकांना आता वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास न्यायालयात जाण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा
फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी बाबासाहेबांचं स्मारक होणार – मुख्यमंत्र्यांची ग्वाही
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवायला लागलं तरी हरकत नाही पण बाबासाहेबांचं स्मारक होणारच अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना दिली.
ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मुख्य सचिवांकडे मागणी
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलेल्या निर्णयांची सखोल चौकशी करावी आणि करदात्या ठाणेकर नागरिकांना न्याय द्यावा तसंच याप्रकरणी जे अधिकारी सामील आहेत त्यांचीही तात्काळ चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं मुख्य सचिवांकडे केली आहे.