भगवान गौतम बुध्दांची २ हजार ५६६वी जयंती आज साजरी करण्यात आली.
आरोग्य पर्यवेक्षिकांचे पोषाहार प्रात्यक्षिक
परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय वि सा सामान्य रुग्णालय येथील ७७ वी स्त्री आरोग्य पर्यवेक्षीका या बॅचचे पोषाहार प्रात्यक्षिक सादर मा जिल्हा शल्यचिकीत्सक कैलास पवार यांचे अध्यक्षतेखाली आणि परिचर्या अधिकारी सिदधी बांदेकर यांच्या मार्गदर्शनाने पार पडले.
कल्याण डोंबिवली महापालिका घेणार तलावाची विशेष काळजी
कल्याण डोंबिवली महानगरपालिका तलावाची विशेष काळजी घेणार आहे.
दारू पिऊन शिवीगाळ करणा-या बहिणीच्या नव-याची हत्या करणा-यास अवघ्या दोन तासात अटक
दारु पिऊन सासरच्या मंडळींना शिवीगाळ करणाऱ्या बहिणीच्या नवऱ्याची रागाच्या भरात तरुणाने राहत्या घरात धारदार चाकुने हत्या केली.
मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉपला आग
मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉपला आग लागण्याची घटना आज सकाळी १० च्या सुमारास घडली.
पुढील वर्षीच्या संभाव्य सुट्ट्या जाहीर – दा कृ सोमण
पुढील वर्षाच्या म्हणजेच २०२४ च्या दिनदर्शिकेचे काम पूर्ण झाले असून सार्वजनिक संस्था किंवा काही लोकांना पुढील वर्षाच्या कामांचे अगोदर नियोजन करण्यासाठी पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी २०२४ मधील संभाव्य सुट्ट्यांची यादी प्रसिद्धीसाठी जाहीर केली आहे.
भगवान गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ वाहतुकीत बदल
राबोडी वाहतूक उपविभागाचे हद्दीत ५ मे ते ६ मे रोजी भगवान गौतम बुध्द यांच्या २५६६ व्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक जवळ शिशुज्ञान मंदिर शाळेच्या बाजूस मनोरंजनाचे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरीकांची गैरसोय होवू नये आणि परिसरातील वाहतूक सुरळीत, सुनिश्चित होण्याकरीता वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
संस्कार भारती ठाणे जिल्हा समितीतर्फे रांगोळी शिबीराचं आयोजन
संस्कार भारती ठाणे जिल्हा समितीतर्फे रांगोळी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.
ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी १२ तास बंद राहणार
ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शनिवारी १२ तास बंद राहणार आहे.
नालेसफाईच्या कामात सर्व विभागांनी समन्वय ठेवावा – महापालिका आयुक्त
ठाणे महापालिका हद्दीतील नाले सफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. ही कामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवावा आणि ३१ मे च्या आधी नालेसफाई पूर्ण करावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.