जिल्ह्यात १११ नवीन कोरोना रूग्ण आढळले.
मुख्यमंत्र्यांचे आता ठाण्यातही कार्यालय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता ठाण्यातही उभारले जात आहे.
हस्तीदंताची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश
हस्तीदंताची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे.
पीएम श्री योजने अंतर्गत ठाण्यातील प्रथम टप्प्यात १४ शाळांची निवड
राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पीएम श्री योजना राबली जात आहे. योजने अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील १४ शाळाची निवड प्रथम टप्प्यात झाली आहे.
आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ८ मे पर्यंत मुदतवाढ
वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ. १ ली ते ८ वी पर्यतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षासाठी ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी दि. ०८ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जुना कोपरी रेल्वे पुल मार्गावर २६ एप्रिल ते २१ मेपर्यंत वाहतुकीत बदल
ठाणे शहरातील जुना कोपरी रेल्वे पूल ते भास्कर कट येथील नवीन सब वे व भास्कर कट ते नवीन कोपरी रेल्वे ब्रिजचे सुरुवातीस खोदकाम करून डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याने २६ एप्रिल ते २१ मे पर्यंत या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
शिपायानेच लुटले उद्योजक रवींद्र पालेकरांचे गोडाऊन
ठाण्यातील प्रसिद्ध उद्योजक रवींद्र पालेकर यांचे वसंत विहार, सिद्धांचल येथे असलेल्या गोडाऊन मधील सजावटीचे आणि इंटेरियरचे महागडे सामान कधीकाळी त्यांच्याकडे काम करणाऱ्या शिपायाने चोरून नेले.
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्यावर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्वीट करणाऱ्या व्यक्ती विरोधात राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकेत ते कशेळी मार्गावरील वाहतुकीत ३० एप्रिल ते २ मे पर्यंत बदल
कापूरबावडी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत साकेत ते कशेळी मार्गावर ३० एप्रिल ते २ मे पर्यंत साईबाबा मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.