राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी भारतीय जनता पक्ष अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दिवा परिसराला वाढीव पाणी पुरवठा करण्यास प्रारंभ
दिवा परिसरामधील वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक घेवून दिवा शहराला दैनंदिन 6.50 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पुरविणेबाबतचे आदेश दिले होते, त्यानुसार प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करुन दिव्याला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपासून वाढीव पाणीपुरवठा देण्यास सुरूवात केली आहे.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी सोडत
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली.
श्रीरंग विद्यालयात दीप प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन
दीप अमावास्येनिमित्त काल श्रीरंग विद्यालयात दीप प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते.
आयटीआय आणि यूएन वुमन्स आयोजित रोजगार मेळाव्यात 287 तरुणींचा सहभाग
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता नावीन्यता विभाग आणि व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण संचालनालयांतर्गत कार्यरत औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि यूएन वूमनच्या वतीने फ्लाईट प्रकल्पाअंतर्गत मुलींसाठी रोजगार मेळावा आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
रेल्वे स्थानक स्वच्छतागृहाचे फेरीवाल्यांनी केले गोदाम
ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ वरील स्वच्छतागृहाच्या काही भागाचे फेरीवाल्यांनी चक्क गोदामात रुपांतर केले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रासाठी विविध विकासकामांसाठी आता आणखी १५ कोटींचा निधी मंजूर
ठाणे महापालिका क्षेत्रासाठी विविध विकासकामांसाठी आता आणखी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
जिल्ह्यामध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस – खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड
जिल्ह्यामध्ये सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असून खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड झाली आहे.
मेट्रो लाईन ४ च्या गर्डर टाकण्याच्या कामामुळे ठाणे ते घोडबंदर वाहतुकीत १० ऑगस्ट पर्यंत बदल
मेट्रो लाईन ४ च्या गर्डर टाकण्याच्या कामामुळे ठाणे ते घोडबंदर वाहतुकीत १० ऑगस्ट पर्यंत बदल करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील जनतेचे जीवन प्रकाशमय करणार – मुख्यमंत्री
हर घर जल प्रमाणेच “हर घर ऊर्जा” हे उद्दिष्ट ठेवून राज्यातील गरीबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा निर्धार व्यक्त करतानाच शहापूर सारख्या आदिवासी तालुक्यात उर्जा महोत्सव घेवून ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य प्रकाशमय करीत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या ऊर्जा महोत्सवाला दिलेल्या शुभेच्छा संदेशाद्वारे व्यक्त केली.