देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात 9 ते 17 ऑगस्ट या काळात स्वराज महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
ठाणे शहरातील तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे शहरातील सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे तहसील कार्यालयाच्या पुनर्विकासाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आज दिल्या.
ठाणे विभागासाठी कळवा येथे बसपोर्ट विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
कळवा येथे राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यशाळा आणि विभागीय भांडार आस्थापना कार्यरत आहे. एस. टी. महामंडळाच्या बस गाड्यांचे मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाते. तसेच विभागीय भांडारामार्फत ठाणे विभागातील सर्व आगारांना दैनंदिन लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा केला जातो. येथे कर्मचाऱ्यांसाठी, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यासाठी एस. टी. महामंडळाच्या उपलब्ध जागेवर कळवा येथे अद्ययावत बसपोर्ट विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सलग तीन दिवस कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून गेल्या तीन दिवसापासून कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.
गोपाळकाल्याची शासन स्तरावर सुट्टी जाहीर करण्याची प्रताप सरनाईकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गोपाळकाल्याची शासन स्तरावर सुट्टी जाहीर करण्याची मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
घरोघरी दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी
आज आषाढ अमावास्या. ही अमावास्या दिव्यांची अमावास्या म्हणून साजरी केली जाते. घरोघरी आज दीपपूजा करून दिव्यांची अमावास्या साजरी करण्यात आली.
येत्या शुक्रवारपासून श्रावण मासास प्रारंभ
येत्या शुक्रवारी २९ जुलै पासून पवित्र श्रावणमासाला प्रारंभ होत असून यावर्षी पाऊस चांगला होत असल्याने आणि कोरोनाचे संकट दूर झाल्याने नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, पोळा इत्यादी सण मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
विसर्जन घाट व कृत्रिम तलावांची महापालिका आयुक्तांनी केली पाहणी
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची आणि विसर्जन घाटांची आज महापालिका आयुक्तांनी पाहणी केली.
रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास १ ऑगस्टपासून बेमुदत बंदचा इशारा
रिक्षा संघटनांच्या प्रलंबित मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास कोकणातील रिक्षा चालकांनी १ ऑगस्टपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.