गायमुख चौपाटीचं काम आता अंतिम टप्प्यात असून येत्या १५ ऑगस्ट पूर्वी या प्रकल्पाचं लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या प्रकल्पाची मेरीटाईम बोर्डाच्या अधिका-यांसह पाहणी केली.
political
खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसह केली ठाणे रेल्वे स्थानकाची पाहणी
वाहनतळाच्या इमारतीची अपूर्ण असलेली कामं लवकरात लवकर मार्गी लावून पहिल्या आणि दुस-या मजल्यावर दुचाकी तर तळमजल्यावर चारचाकी वाहनं उभी करण्याची सोय करावी अशी सूचना खासदार राजन विचारे यांनी रेल्वेला केली आहे.
शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी 20टक्केअनुदान देण्याची खासदार राजन विचारे यांची केंद्रशासनाकडे मागणी
ठाणे शहरांतर्गत मेट्रो मार्गासाठी २० टक्के अनुदान देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांची केंद्र शासनाकडे केली आहे.
जलवाहतूक प्रकल्पाला १०० टक्के अनुदान देण्याच जल परिवहन केंद्रीय राज्यमंत्र्यांचे आष्वासन
ठाणे शहराला लाभलेला खाडी किनारा तसेच शहरात होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषण
टाळण्यासाठी पाच महापालिकांना जोडणारा जलवाहतुकीचा पर्याय आवश्यक असल्याने
ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी
महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह जलवाहतूक केंद्रीय मंत्री मंनसुख
मंडाविया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या विकास प्रकल्प बाबत सादरीकरण करून चर्चा
केली.
वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे – श्रीकांत शिंदे
जंगलात आगी लागण्याचे प्रमाण गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वाढले असून
या संदर्भात काही कडक कायदे तसेच शिक्षा आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे केंद्र
सरकारकडून नियमित लेखापरीक्षण व्हावे अशी मागणी कल्याण डोंबिवलचे खासदार
श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात केली.
ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये आपल्या कतृत्वाचा झेंडा रोवणार्या महिलांचा सत्कार
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या महिला धोरणाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रामध्ये आपल्या कतृत्वाचा झेंडा रोवणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
पालिका आयुक्तांच्या आश्वासना नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा तूर्त स्थगित
कळवा- खारीगाव, विटावा भागात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने नागरीक हैराण झाले आहेत. ही पाणीटंचाई दूर करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळवा प्रभाग समितीवर हजारो लोकांचा जनआक्रोश मोर्चा नेण्यात येणार होता.
वर्सोवा पुलाच्या बांधकामास दोन वर्षाचा कालावधी लागणार
मुंबई आणि ठाणे, वसई, मीरा-भाईंदर तसेच उपनगरीय शहरातील महानगरपालिका क्षेत्रात जोडणारा अत्यंत महत्वाचा मुंबई-अहमदाबाद मार्गावरील नॅशनल हायवे 48 वर्सोवा येथील नवीन पुलाच्या कामाच्या बांधकामाचे 11 जानेवारी 2018 रोजी झालेल्या भूमीपूजनानंतरही पर्यावरण विभागाच्या परवानगी मिळाली नसल्याने या पुलाचे बांधकामास प्रत्यक्षात सुरू झाले नव्हते.
भिवंडी उपजिल्हा रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
भिवंडी उपजिल्हा रूग्णालय म्हणजे इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयाच्या दुरूस्तीसाठी आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाजवळ असलेल्या खेळाच्या मैदानाच्या संरक्षण भिंतीच्या कामात अनागोंदी झाल्याचा निलेश कोळी यांचा आरोप
आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाजवळ असलेल्या खेळाच्या मैदानाच्या संरक्षण भिंतीच्या कामात अनागोंदी झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष निलेश कोळी यांनी केला आहे.