शालेय पाठ्यपुस्तक बालभारतीच्या मराठी कवितांचा आविष्कार ठाण्यातील गंधार या संस्थेनं साकारला असून या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या प्रयोगातून जमा झालेला ५१ हजारांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आला.
स्वामी प्रतिष्ठानतर्फे चंदगड तालुक्यात २५ पूरग्रस्तांना घरं बांधून देणार
स्वामी प्रतिष्ठानतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील २५ पूरग्रस्तांची घरं नव्यानं बांधून दिली जाणार आहेत.
याचिका मागे घेण्याचे न्यायालयाचे आदेश – वेगवेगळ्या विषयांवर स्वतंत्र याचिका दाखल करण्याची न्यायालयाची मुभा – रोहित जोशी
उच्च न्यायालयानं महापालिकेशी संबंधित याचिका मागे घेण्यास परवानगी देताना या याचिकेतील सर्व विषयांसाठी वेगवेगळ्या याचिका दाखल करण्याची अनुमती दिली असा दावा महापालिकेच्या विरोधात जनहितार्थ याचिका दाखल करणा-या रोहित जोशी यांनी केला आहे.
शिवशिल्पाच्या दुरूस्तीवरून महापौर दालनात राडा
ठाणे महापालिकेच्या बाहेर असलेल्या शिवशिल्प दुरूस्तीवरून महापौर दालनात मराठा मोर्चाचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांच्यात जोरदार वादावादी झाली.
जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणा-या आस्थापनांनी त्याची विहित मार्गाने विल्हेवाट लावणे गरजेचे – उपजिल्हाधिकारी
ठाण्यातील जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणा-या आस्थापनांनी त्याची विहित मार्गाने विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिले आहेत.
ठाणे महापालिकेचे माजी उपलेखापाल सुधाकर मुळे यांचं निधन
ठाणे महापालिकेचे माजी उपलेखापाल सुधाकर मुळे यांचं काल निधन झालं.
जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी मिळवलं यश
डोंबिवली येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील खेळाडूंनी यश मिळवलं आहे.
राज ठाकरेंना नोटीस आल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याची आत्महत्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवल्याच्या कारणावरून ठाण्यातील एका कार्यकर्त्यानं आत्महत्या केली आहे.
पर्यावरण प्रेमीवर उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्याची नामुष्की
ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीनं मंजुरी दिलेल्या प्रकरणांवर मुंबई उच्च न्यायालयात रोहित जोशी या पर्यावरण प्रेमी नागरिकानं दाखल केलेली याचिका त्यांना मागे घ्यावी लागली आहे.
शहरातील दिव्यांगांना १० सप्टेंबर पर्यंत मिळणार हक्काची घरं
शहरातील दिव्यांगांना हक्काचं घर मिळणार आहे. १० सप्टेंबर पर्यंत पहिल्या टप्प्यातील घरांचे वितरण करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.