स्वामी प्रतिष्ठानतर्फे चंदगड तालुक्यात २५ पूरग्रस्तांना घरं बांधून देणार

स्वामी प्रतिष्ठानतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील २५ पूरग्रस्तांची घरं नव्यानं बांधून दिली जाणार आहेत. स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. स्वामी प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. स्वामी प्रतिष्ठानतर्फे हिरानंदानी मिडोज चौकात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. गेल्यावर्षी हा दहीहंडी उत्सव अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित करताना केरळमधील पूरग्रस्तांना आणि राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निधी देऊन सामाजिक बांधिलकी जपली होती. यंदा कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील २५ पूरग्रस्तांना नव्यानं घरं बांधून दिली जाणार आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख ५५ हजार रूपयांचा निधी दिला जाणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading