गायमुख पोलीस चौकीजवळ आज सकाळच्या सुमारास एका रिक्षाला लागलेल्या आगीत एक महिला जळून भस्मसात झाली आहे तर रिक्षाचालक गंभीररित्या भाजला आहे.
भिवंडी दुर्घटनेत अकरा जखमी तर दोन मृत
आज दिनांक २९/०४/२०२३ रोजी १३:०० वाजताच्या सुमारास प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार वर्धमान कंपाऊंड, वाल व्हिलेज, दापोडा मार्ग, भिवंडी ग्रामीण, भिवंडी. या ठिकाणी मे. एम.आर.के. फुड्स (तळ+०३ मजली इमारत, अंदाजे १० वर्षे जुनी इमारत) ही इमारत कोसळली आहे. या सदर घटनास्थळी इमारतीमध्ये अंदाजे २२-रहिवाशी अडकले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.-सदर घटनास्थळी प्रांत … Read more
भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर
भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार … Read more
महाराष्ट्र दिनी ठाणे महापालिका ‘आयुक्तांचा नागरिकांशी संवाद’
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने ‘आयुक्तांचा नागरिकांशी संवाद’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवार, ०१ मे रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर नागरिकांशी संवाद साधणार आहेत.महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ०१ मे रोजी सकाळी ७.१० मिनिटांनी राष्ट्रध्वजारोहण समारंभ पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात होईल. याच समारंभात महापालिकेत कार्यरत असलेल्या गुणवंत सफाई कामगारांचा आयुक्त श्री. बांगर … Read more
सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात रविवारपासून “आनंद पथ” रस्ता आरोग्याचा उपक्रम
सदृढ आरोग्यासाठी…. चला आनंदपथावर
आपण सारे नाचू-गाऊ, योगा आणि आपले खेळ खेळूया. या शिर्षकाअंतर्गत “आनंद पथ” रस्ता आरोग्याचा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे अशी माहिती माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन
कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्रप्रदर्शनाचे आयोजन राज राजापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. धनुष्यबाण न घेता भाऊ, पत्नी, भक्त आणि अनुयायांच्या सान्निध्यात रममाण झालेल्या श्री रामाची विविध रूपे या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना पाहता आली. या चित्रप्रदर्शनाचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.
खरीप हंगामासाठी कृषि विभागाकडून रासायनिक खते व भात बियाण्यांचे नियोजन
ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरु झाली असून त्यासाठी लागणारी रासायनिक खते, बी-बियाणे आणि किटकनाशके या निविष्ठा शेती आणि शेतकरी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत.
मुख्यमंत्र्यांचे आता ठाण्यातही कार्यालय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता ठाण्यातही उभारले जात आहे.
हस्तीदंताची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश
हस्तीदंताची अवैधरित्या विक्री करण्यासाठी आलेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे.