कापुरबावडीमध्ये नवीन विश्रामगृह बांधलं जाणार आहे.
महिना: एफ वाय
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
चांगल्या सवयी आणि चांगले विचार या दोन्ही गोष्टी शरीर आणि मनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी आवश्यक – डॉ. विकास हजरनिस
आपलं आरोग्य उत्तम राखणं हे आपल्या हाती आहे. त्याची सुरूवात घरातील आणि घराबाहेरील परिसराची नियमितपणे स्वच्छता करून करायला हवी. स्वच्छ वातावरणात जंतू संसर्गाचं प्रमाण कमी होतं आणि मनही प्रसन्न राहतं.
कन्याकुमारी एक्सप्रेस आता ठाण्यात थांबणार असल्यामुळं तिरूपतीच्या भक्तांची सोय होणार
कन्याकुमारी एक्सप्रेस आता ठाण्यात थांबणार असल्यामुळं तिरूपतीच्या भक्तांची सोय होणार आहे.
अथर्वच्या अष्टपैलू कामगिरीमुळे आणि सौख्य मढवीच्या झंझावती शतकामुळे सरस्वतीचा मोठा विजय
अथर्व कोशिरेड्डीचा अष्टपैलू खेळ आणि सौख्य मढवीच्या शतकी खेळीच्या जोरावर सरस्वती विद्यालयानं चंद्रकांत पाटकर विद्यालयाचा १९२ धावांनी दणदणीत पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या १४ वर्षाखालील घंटाळी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी लढतीत स्थान मिळवले.
जिवंतपणीच मृत्यूचे खोटे दाखले करून विमा कंपन्यांची लाखो रूपयांची फसवणूक – ६ अटक
जिवंतपणीच मृत्यूचे खोटे दाखले तयार करून विमा कंपन्यांची लाखो रूपयांची फसवणूक करण्याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेनं ६ जणांना अटक केली असून यामध्ये दोघा डॉक्टरांचाही समावेश आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
ठाण्यात ६९वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
भारताचा ६९वा प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा झाला.
शिवसेनेनं युती तोडू नये म्हणून १०० कोटींचं गाजर – अशोक चव्हाण यांचा टोला
युती झाली तरी आणि नाही झाली तरी आम्हांला काही फरक पडत नाही. आगामी निवडणुकीत शिवसेनेनं युती तोडू नये म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला १०० कोटींचं गाजर दाखवत आहेत असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लगावला.
स्मार्ट किडस् स्पर्धेत विपुल म्हात्रे, अद्वय झा, प्रियांका गुप्ता आणि अक्षय मालहन प्रथम
विद्यार्थ्यांच्या बौध्दीक विकासासाठी त्यांना स्मार्ट बनवण्याकरिता ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डीजी ठाणे स्मार्ट मुले प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोठ्या गटात आर. एस. देवकर, इंग्रजी माध्यमाचा विपुल म्हात्रे आणि प्रियांका गुप्ता यांनी प्रथम तर लहान गटात न्यू होरायझन स्कूलच्या अद्वय झा आणि अक्षय मालहन यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्ह्यामध्ये ३ लाख ५४ हजार मतदारांची वाढ
जिल्ह्यामध्ये ३ लाख ५४ हजार मतदारांची वाढ झाली आहे. जिल्हाधिका-यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हाधिका-यांनी ही माहिती दिली.