ठाण्यामध्ये दुचाकी जाळण्याचे लोण सुरूच असून महागिरी कोळीवाड्यात तीन गाड्या आगीत भस्मसात झाल्या.
महिना: एफ वाय
महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा
महापालिका क्षेत्रात लोकशाही पंधरवडा कार्यक्रम सुरू झाला असून यानिमित्तानं लोकशाही बळकट करण्याचा निर्धार प्रशासन आणि पदाधिका-यांनी केला.
राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यक्रमात सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण तर सर्वात कमी मतदार नोंदणी कोपरी विधानसभा मतदारसंघात
राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यक्रमात सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण तर सर्वात कमी मतदार नोंदणी कोपरी विधानसभा मतदारसंघात झाली.
धोकादायक इमारतीमधील स्थलांतरीत समूह विकास योजनेसाठी पात्र – पालिका आयुक्त
समूह विकास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बोगस नावांची नोंद होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देतानाच ज्यांची मालमत्ता कराची थकबाकी असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र धोकादायक इमारतीमधील स्थलांतरीत समूह विकास योजनेसाठी पात्र ठरतील असा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
मेट्रोची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर होण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्तांची जर्मनीतील बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मेट्रोच्या अधिका-यांसमवेत चर्चा
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या अंतर्गत मेट्रोची प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर होण्याच्या दृष्टीनं महापालिका आयुक्तांनी जर्मनीतील बँकेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मेट्रोच्या अधिका-यांसमवेत चर्चा केली.
ठाणे महापालिकेतर्फे साडेसहा हजाराहून अधिक महिलांना वार्षिक १८ हजारांचं अनुदान
ठाणे महापालिकेतर्फे ठाण्यातील साडेसहा हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक महिलांना १८ हजार रूपयांचं वार्षिक अनुदान मिळणार आहे.
अंतर्गत रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करावा या मागणीकरिता निळकंठ ग्रीनचे रहिवासी उद्या काढणार मोर्चा
गृहसंकुलातील अंतर्गत रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद करावा या मागणीकरिता निळकंठ ग्रीन आणि सत्यशंकर रेसिडेन्सी येथील रहिवासी उद्या मोर्चा काढणार आहेत.
बीजे हायस्कूलचं काम पुन्हा एकदा रखडलं
ठाण्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बैरामजी जीजीभॉय म्हणजे बीजे हायस्कूलचं काम पुन्हा एकदा रखडलं आहे.
१२ तासात मुंबई ते दिल्ली अंतर कापणा-या भव्य द्रूतगती महामार्गाचं काम लवकरच सुरू केलं जाईल – नितीन गडकरी
बुलेट ट्रेनच्या तोडीस तोड असा १ लाख कोटी रूपयांचा आणि १२ तासात मुंबई ते दिल्ली अंतर कापणा-या भव्य द्रूतगती महामार्गाचं काम लवकरच सुरू केलं जाईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
कल्याण ते बदलापूर मेट्रोची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात जलवाहतुकीवर भर दिला जाणार असून या संदर्भातील एक विस्तृत जल वाहतूक आराखड्यास लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.