जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी अगदी अंतिम टप्प्यापर्यंत मतदार नोंदणी होत असल्यामुळं जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत २२७ नं वाढ झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली.
Election
लोकसभा निवडणुका निर्भय आणि शांत वातावरणात व्हाव्यात म्हणून पोलीसांचं ठिकठिकाणी संचलन
लोकसभा निवडणुकीमध्ये निर्भय आणि शांत वातावरणात मतदान व्हावं यासाठी पोलीस कसून तयारीला लागले असून ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पोलीसांनी काल संचलन केलं.
दिव्यांगांनी अनुभवली व्हीव्हीपॅट यंत्राची कार्यप्रणाली
लोकसभा निवडणुकीकरता मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणा-या व्हीव्हीपॅट यंत्राची कार्यप्रणाली दिव्यांगांनी अनुभवली.
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान केंद्रांवर सुविधांची बरसात
निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असून यंदाच्या निवडणुकीत तर यामध्ये मोठी भर पडली आहे.
जिल्ह्यामध्ये वयाची ८० पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार
जिल्ह्यामध्ये वयाची ८० वर्ष पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत तर सर्वात तरूण म्हणजे १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदानाचा प्रथम हक्क बजावणारे ४३ हजार ७५८ मतदार आहेत.
जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची जिल्ह्यातील १८ विधानसभा संघनिहाय सरमिसळ
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची जिल्ह्यातील १८ विधानसभा संघनिहाय सरमिसळ करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान बँकेतून होणा-या आर्थिक व्यवहारांवर जिल्हा प्रशासनाची नजर
आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन देणं वा अन्य हेतूने केल्या जाणा-या प्रकारांना आळा घालण्यासाठी बँकांमधून होणा-या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवण्यात येणार आहे. असे संशयास्पद व्यवहार बँकांनी तात्काळ निवडणूक यंत्रणेस कळवावेत असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व बँकांना दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केली एकमेकांवर रंगांची उधळण
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये युती झाली असली तरी या युतीचा रंग निवडणुक निकालाच्या वेळेस स्पष्ट होणार आहे.
ठाण्यातून राजन विचारे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेतर्फे लोकसभेची उमेदवारी
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपली २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
निवडणुकीतील गैरप्रकारांच्या तक्रारीसाठी निवडणूक आयोगाच सिविजील ॲप जिल्ह्या
लोकसभा निवडणुकांमध्ये डिजिटल माध्यमांचा गोंधळ सुरू असतानाच या डिजिटल माध्यमाद्वारेच निवडणूक आयोगानेही लोकसभा निवडणुकांमध्ये आदर्श आचारसंहितेच, काटेकोर पालन व्हावे यासाठी उपयोग करण्याचे ठरवले आहे.