ठाणे शहरातील नाल्यांची सफाई 75 टक्के झाली आहे. महापालिका आयुक्तांनी काल शहरातील विविध नाल्यांची पाहणी केली, त्यावेळी नाल्यांची सफाई 75 टक्के झाले असल्याचे समोर आले.
महिना: एफ वाय
ठाण्यातील साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं ठाणे मतदाता जागरण अभियानाच आवाहन
ठाण्यातील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक वृक्ष वाचवण्यासाठी ठाणेकरांनी एकत्र यावे असे आवाहन ठाणे मतदाता जनजागरण अभियानाने केला आहे.
वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषच्या सहाव्या पर्वात, मनोविकास थीम
वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषच्या सहाव्या पर्वात, येत्या शनिवार आणि रविवारी मनोविकास या थीमवर तेरा वस्त्यांमधील कार्यकर्ते कलाकार स्वरचित नाटिका सादर करणार असल्याची माहिती समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. संजय मंगला गोपाळ यांनी दिली आहे.
मोबाईल नेटवर्क गायब करून मोबाईल धारकाच्या बँकेतून पैसे काढणाऱ्या टोळीतील एकाला अटक
मोबाईल नेटवर्क गायब करून मोबाईल धारकांच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या टोळीतील एकाला गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः घालणार लक्ष
आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यामध्ये पक्षाची कामगिरी चांगली व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वतः लक्ष घालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर एक जूनला शरद पवार पक्षाची कामगिरी ठाण्यात चांगली व्हावी यासाठी लक्ष घालणार आहेत. पक्षाच्या स्थानिक मंडळींनी काल शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे संख्या दिले. पक्षाच्या एक जूनच्या बैठकी पक्षाच्या … Read more
शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना,घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे – आमदार निरंजन डावखरे
शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटाजवळील खोऱ्यात अमृतकूंभ जलसागर धरण उभारावे, अशी आग्रही मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.
आमदार संजय केळकर यांच्या कडुन मावळी मंडळ शाळेला आमदार निधीतून तातडीन ३५ संगणक
चरई परिसरातील मावळी मंडळ शाळेच्या संगणक कक्षाला अचानक लागलेल्या आगीत शाळेतील संगणक जाळून खाक झाले.
दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची सभागृह नेते नरेश म्हस्केची मागणी
ठाण्यातील दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिव्यांगांना घरे उपलब्ध करून देण्याची मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
कोयना पुनर्वसन करंजवडे गावातील नागरिकांनी तब्बल त्रेपन्न वर्षानंतर पुनर्वसन गावात आपल्या कुलदैवत अंबे मातेचे बांधल मंदिर
कोयणा धरणासाठी आपल्या जमिनी शासनाला देऊन ठाणे जिल्ह्यात विस्थापित झालेल्या कोयना पुनर्वसन करंजवडे गावातील नागरिकांनी तब्बल त्रेपन्न वर्षानंतर पुनर्वसन गावात आपल्या कुलदैवत अंबे मातेचे सुंदर असे मंदिर बांधल आहे.
चार खासदारांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष नागरी सत्कार
ठाणे – पालघर जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेना – भाजप महायुतीवर मोठा विश्वास दाखविल्याने आपले चार खासदार निवडून आले आहेत.