मोबाईल नेटवर्क गायब करून मोबाईल धारकाच्या बँकेतून पैसे काढणाऱ्या टोळीतील एकाला अटक

मोबाईल नेटवर्क गायब करून मोबाईल धारकांच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या टोळीतील एकाला गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. काल एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. गुन्हे अन्वेषण शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेला दिव्यातील श्रीकृष्ण पार्क येथे एक जण गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल राव यांनी पाळत ठेवली होती. अपेक्षेनुसार ही व्यक्ती आल्यावर पोलिसांनी त्याला पकडून त्याची चौकशी केली. या चौकशीमध्ये बँक खाते हॅक करून पैसे लुटणारी टोळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जगदीश कावरिया यांना मुंबई आणि हैदराबाद येथे अशाप्रकारे दोघांना 23 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. कावळ्याची टोळी आधार कार्ड धनादेश किंवा पॅन कार्डची प्रत कर्ज देणाऱ्या कडून खरेदी करत असेल त्यानंतर तंत्रज्ञानाच्या साह्याने मोबाईलला नेटवर्क गायब केले जातात मोबाईल धारकांना बँक खाते तपासू नये म्हणून ही टोळी हे काम फक्त शुक्रवारी करत असेल ज्या व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे केले जाते. त्याला मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे पैसे वळते झाल्याच्या समजत नसे अशा पद्धतीने कावरियाची टोळी काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading