ठाण्यातील मनोरमा नगर भागात असलेल्या शिवसेना शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गट काल एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
political
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करत राज्य शासनाचा निषेध केला.
सोसायट्यांमधील झाडांच्या छाटणीची जबाबदारीही पालिकेचीच – आमदार संजय केळकर
नागरिक वृक्ष कर भरत असल्याने गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातील झाडांची छाटणी करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेचीच आहे असा आग्रह धरत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याने सोसायट्यांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची खासदार राजन विचारें कडून पाहणी
ठाणे कोपरी रेल्वे पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची खासदार राजन विचारेंनी आज पाहणी केली.
वेदांता प्रकल्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त झालेल्या कार्यक्रमादरम्यान शिवसेना-भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी
वेदांतावरून झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसेना उध्दव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याने काही काळ गोंधळ उडाला.
शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा या मागणीसाठी स्वाक्षरी मोहिम
शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करावा या मागणीसाठी आज स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली.
वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वाहतुकीचं नियोजन करणं गरजेचं – निरंजन डावखरे
ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वाहतुकीचं नियोजन करणं गरजेचं आहे अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.
अनंत करमुसे प्रकरणात उच्च न्यायालयाचे त्यांच्यावर ताशेरे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत करणाऱ्या अनंत करमुसे याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वगैरे नसतो – जितेंद्र आव्हाड
प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वगैरे नसतो लोकांच्या मनात जावे लागते,धर्मवीर आनंद दिघे असताना देखील या विभागातून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर कधीच निवडणूक हरले नव्हते आणि त्यांच्या पश्चात जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे त्यांचा वारसा पुढे चालवत असून नागरिकांना अपेक्षित असणारे काम करत आहेत असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
मध्यमवर्गीयच आता रेल्वेला धडा शिकवतील – जितेंद्र आव्हाड
रेल्वे हा देशातील ऐतिहासिक ‘गेंडा’ आहे. त्यांना ऊन, वारापाऊस, इंजेक्शन वगैरे काही चालत नाही. त्यांच्यावर असरच होत नाही. पुढील आंदोलन हे आपल्या हातात नाही. तर ते जनतेच्या हातात आहे. मध्यमवर्गीयांच्या मनात आता रेल्ेवच्या बाबतीत राग पेटतोय; ते आता रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. जर, सकाळच्या वेळी सर्व प्रवाशी अर्धा तास आधी येऊन रेल्वेस्थानकात फलाटावरच मांडी घालून बसले तर काय होईल? प्रवाशांसमोर बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नाही, असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला.