प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वगैरे नसतो – जितेंद्र आव्हाड

प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वगैरे नसतो लोकांच्या मनात जावे लागते,धर्मवीर आनंद दिघे असताना देखील या विभागातून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर कधीच निवडणूक हरले नव्हते आणि त्यांच्या पश्चात जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे त्यांचा वारसा पुढे चालवत असून नागरिकांना अपेक्षित असणारे काम करत आहेत असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. त्यांच्या हस्ते शास्त्रीनगर-सहकारनगर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
निवडणूका येतात जातात जनसामान्यांच्या सुख दु:खात सामील होणं हे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असतात.नागरिकांच्या समस्या – प्रश्न सोडवत असतात हि सर्व कामे करण्यासाठी कार्यालय असावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. रामचंद्र ठाकूर यांनी या विभागाचे प्रतिनिधित्व केले.धर्मवीर आनंद दिघे असताना देखील रामचंद्र ठाकूर या विभागातून कधीच निवडणूक हरले नव्हते त्यामुळे प्रभाग कोणाचे बालेकिल्ला वैगरे नसतात लोकांच्या मनात जावे लागते.आणि त्यांच्या पश्चात जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे त्यांचा वारसा पुढे चालवत असून नागरिकांना अपेक्षित असणारे काम करत आहेत असे आव्हाड म्हणाले.
शास्त्रीनगर प्रभागातून निवडून आल्यांनतर गेल्या पाच वर्षात या विभागाचा अभ्यास करून प्रश्न समस्या समजून घेऊन या विभागातील काही औनशी समस्या सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्यात आला असून अजून देखील काही समस्या आहेत त्या आगामी काळात सोडवल्या जातील आणि या विभागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या सृष्टीने पावले आम्ही उचलणार असल्याचे हणमंत जगदाळे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading