सरस्वती मंदिर ट्रस्टमध्ये दिवाळीच्या निमित्ताने मराठीतील नामांकित १० प्रकाशकांनी ‘वाचन जागरण महोत्सव’ आयोजित केला आहे.या उपक्रमांतर्गत निवडक पुस्तकांवर २५% सवलत या प्रकाशकांनी जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेऊन पुस्तक भेट योजना सरस्वती मन्दिर ट्रस्ट ने जाहीर केली आहे.
Education
डॉ. व्ही. एन. बेडेकर मॅनेजमेंट स्टडीज् ही संस्था आऊटस्टँडींग बी स्कूल ऑफ एक्सलन्स म्हणून जाहीर
ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाची डॉ. व्ही. एन. बेडेकर मॅनेजमेंट स्टडीज् ही संस्था आऊटस्टँडींग बी स्कूल ऑफ एक्सलन्स म्हणून जाहीर झाली आहे.
इस्रो सायबरस्पेस स्पर्धेत ठाण्याच्या अविष्कार निंबाळकरचा सहभाग
रेनबो इंटरनॅशनल स्कूल मधील ९ वी चा विद्यार्थी अविष्कर निंबाळकर याने भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) आयोजित केलेल्या इस्रो सायबरस्पेस निबंध स्पर्धेत सहभाग नोंदवत भविष्यकाळातील अवकाश पर्यावरण आणि त्यातील आव्हाने याबद्दल आपले मत मांडले.
शासनाने कोचिंग क्लासेसनाही परवानगी द्यावी – कोचिंग क्लासेस संघटनेची मागणी
सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून कोचिंग क्लासेसनाही परवानगी द्यावी अशी मागणी राज्य कोचिंग क्लासेस संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी शासनाकडे केली आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण अथवा परीक्षेपासून वंचित ठेवले गेल्यास पालिकेच्या शिक्षणाधिका-यांचा कारवाईचा इशारा
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण अथवा परीक्षेपासून वंचित ठेवले गेल्यास कारवाईचा इशारा ठाणे महापालिकेच्या शिक्षणाधिका-यांनी दिला आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवम ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिवम ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
सरस्वती शाळेची विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण शृंखला
पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात बंधमुक्त कृतिशील सहजशिक्षण देण्याचा उपक्रम राबवणाऱ्या ठाण्यातील सरस्वती शाळेच्या मुख्यध्यापिका रती भोसेकर यांनी विद्यार्थ्यासाठी नवी दृष्टी नवी ओळख ही ऑनलाईन प्रशिक्षण शृंखला आयोजीत केली आहे.
भिवंडी महापालिकेतील सफाई कामगार लॉकडाऊन काळात झाली शिक्षिका
भिवंडी महापालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणा-या रेश्मा सोनावणे यांनी आपली जुनी इच्छा पूर्ण केली असून यामुळे त्या सकाळी सफाई कामगार तर दुपारी शिक्षिका म्हणून काम करत आहेत.
स्वतःमधले गुण जोपासत सतत पुढे जाणारे एकलव्य समाजासाठी प्रेरणादायी – दिलीप प्रभावळकर
घरातील प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता दहावीच्या वर्षातही काम करत शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे समाजासाठी प्रेरणादायी आहेत. प्रतिकुलतेमध्ये कमीतकमी गुण मिळवूनही उत्तीर्ण झाले तरी त्यांचे गुण सधन स्थितीतील मुलांना मिळालेल्या ९० ते ९५ टक्के गुणांबरोबर आहेत असे विचार सिनेनाट्य अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केले.
आर.टी.ई. प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या बालकांचे १५ सप्टेंबर पर्यंत प्रवेश निश्चित करण्याचं शिक्षणाधिका-यांचं आवाहन
आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी १५ सप्टेंबरपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा असे आवाहन शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी केले आहे.