जिल्ह्यात ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ऑक्सिजन पुरवठा, रुग्णालयातील व्यवस्था, मनुष्यबळ यांचा आढावा घेऊन संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.
वर्ष: वाय
शासनाच्या कोरोना विषयक निर्बंधांचं उल्लंघन केल्यास खाजगी व्यक्तींना ५०० रूपये तर आस्थापनांना १० हजार रूपये दंड ठोठावण्याचा पोलीसांचा इशारा
शासनाच्या कोरोना विषयक निर्बंधांचं उल्लंघन केल्यास खाजगी व्यक्तींना ५०० रूपये तर आस्थापनांना १० हजार रूपये दंड ठोठावण्याचा इशारा ठाणे पोलीसांनी दिला आहे.
माजिवडा-मानपाडामध्ये आज १०० नवे रूग्ण
ठाण्यात आज २५५ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये आज १०० नवे रूग्ण सापडले.
जिल्ह्यात आज ३६ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार संध्याकाळी साडे सातपर्यंत ३६ हजार ५६५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानांतर्गत ठाणे महापालिकेच्यावतीने ६ ते १० वर्षे आणि ११ ते १४ वर्षे या दोन वयोगटासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल नारिवली ग्रामपंचायतीचा गौरव
कोवीड संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार गावातील नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण केल्याबद्दल देशाच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत मुरबाड तालुक्यातील नारिवली ग्रामपंचायतीचा आज केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
प्लास्टिकविरोधात महापालिकेची कडक कारवाई – ३०० किलो प्लास्टिक जप्त तर २ लाखांचा महसूल जमा
स्वच्छ महाराष्ट्र मिशन यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार १६ एप्रिल ते ३० डिसेंबर या कालावधीत ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग स्तरावर प्रदूषण नियंत्रण विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि समाज विकास विभाग यांच्या समन्वयाने प्लास्टिक वापरणाऱ्या १००० आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर प्रभाग समितीनिहाय भरारी पथके
कोव्हीडचा वाढता संसर्ग आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या वतीने भरारी पथकांची निर्मिती करून या पथकांच्या मार्फत शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंटवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीवरून कालिचरण बाबावर गुन्हा
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणारा तथाकथित संत कालिचरण याच्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या फिर्यादीवरून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.