जम्मू काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संजय रजपूत आणि नितीन राठोड यांच्या कुटुंबियांना महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांतर्फे एक महिन्याच्या मानधनाची रक्कम पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली.
TMC
मोबाईल व्हॅनवरील जाहिराती काढून सर्व मोबाईल व्हॅन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत
जाहिरात फलकामुळे कोणतीही जिवितहानी होऊ नये याकरिता ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील मोबाईल व्हॅनवरील जाहिराती काढून सर्व मोबाईल व्हॅन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.
कलकत्ता येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील डॉक्टरांनी केला निषेध
कलकत्ता येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील डॉक्टरांनी निषेध केला आहे.
२० पेक्षा जास्त तक्रारींना अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि उद्यान विभागाचा तात्काळ प्रतिसाद
शहरातील स्टेशन परिसरात पडलेले जाहिरातीचे फलक, गोखले रस्त्यावर उन्मळून पडलेलं झाड, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन विभागाच्या वतीनं तात्काळ हटवण्याची कारवाई करण्याबरोबरच २० पेक्षा जास्त तक्रारींना अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि उद्यान विभागानं तात्काळ प्रतिसाद दिला आहे.
टीडीआरएफच्या ४० जवानांच्या चमूला पूरजन्य परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण
आपत्तीजन्य परिस्थितीत सामना करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या टीडीआरएफच्या ४० जवानांच्या चमूला आज प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या वतीनं पूरजन्य परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
टायर पंक्चर्स दुकानदारांनी टायर्स एकावर एक ठेवताना आच्छादित करून ठेवण्याचं महापालिकेचं आवाहन
ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व टायर पंक्चर्स दुकानदारांनी दुकानाबाहेर टायर्स एकावर एक ठेवताना आच्छादित करून ठेवावेत असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
पावसाळ्यात उद्भवणा-या संसर्गजन्य आजारांबाबत नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचं महापालिकेचं आवाहन
पावसाळ्यामध्ये शहरात विविध आजार पसरण्याची शक्यता असते. पावसाळ्यात उद्भवणा-या संसर्गजन्य आजारांबाबत नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे.
गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामध्ये आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं दिला १०५ तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद
ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं गेल्या दोन दिवसात १०५ तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद दिला आहे.
पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी सर्व महापालिका अधिकारी कर्मचा-यांनी सतर्क रहावं – अतिरिक्त आयुक्त
पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी सर्व महापालिका अधिकारी कर्मचा-यांनी सतर्क रहावं. सततच्या पडणा-या पावसामुळं शहरातील सखल भागात साचणा-या पाण्याचा तात्काळ निचरा व्हावा यासाठी त्या ठिकाणी तातडीनं उपाययोजना कराव्यात तसंच ज्या ठिकाणी अत्यावश्यक कामं सुरू आहेत तो परिसर संरक्षित करून कामं करावीत. पावसामुळे शहरात कोणतीही जिवित आणि वित्तहानी होणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीनं करावी अशा सूचना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी दिल्या आहेत.
ठाणे शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा
ठाणे शहराला काही दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.