पावसाळ्यामध्ये शहरात विविध आजार पसरण्याची शक्यता असते. पावसाळ्यात उद्भवणा-या संसर्गजन्य आजारांबाबत नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे. पाणी उकळून आणि गाळून प्यालं, पाणी शुध्दीकरणासाठी क्लोरीनचा वापर करावा, इमारतीवरील गच्ची आणि जमिनीवरील टाकी तसंच घरातील पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात, शिळे तसंच उघड्यावरील अन्नपदार्थ खाणं टाळावं, जुलाब झाल्यास ओआरएस पाकिटं जवळच्या आरोग्य केंद्रातून मोफत घ्यावीत, आवश्यक नसताना साचलेल्या पाण्यातून चालणं टाळावं, त्याचप्रमाणे आजूबाजूची कोणीही व्यक्ती काविळ, विषमज्वर अशा साथीच्या रोगाने आजारी असल्यास महापालिकेला अथवा आरोग्य विभागाला कळवावं असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे.