ठाणे शहराला काही दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. भातसा धरणाच्या झडपा उघडण्यात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळं मंगळवारपासून शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा होत आहे. सध्या या झडपांमधील बिघाड दुरूस्त करण्याचं काम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळं शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे तर काही भागात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही असं महापालिकेनं कळवलं आहे.