आपत्तीजन्य परिस्थितीत सामना करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या टीडीआरएफच्या ४० जवानांच्या चमूला आज प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या वतीनं पूरजन्य परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एनडीआरएफच्या धर्तीवर टीडीआरएफची निर्मिती करण्यात आली आहे. या दलामध्ये ४० जवान आणि एक उपकमांडंट आहे. या दलाला सक्षम करण्यासाठी आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे मदत करता यावी यासाठी त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. या दलातील जवानांना मासुंदा तलाव येथे पूरजन्य परिस्थितीत बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसंच इमारत कोसळल्यानंतर शोध, सुटका आणि प्रथमोपचाराचेही प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणानंतर दलातील जवान तीन पाळ्यांमध्ये महापालिका क्षेत्रात २४ तास कार्यरत राहणार आहेत.