ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व टायर पंक्चर्स दुकानदारांनी दुकानाबाहेर टायर्स एकावर एक ठेवताना आच्छादित करून ठेवावेत असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. पावसाळ्यामध्ये दुकानाबाहेर उघड्यावर ठेवलेल्या रबरी टायर्समध्ये किंवा आजूबाजूच्या मोकळ्या जागेत बेजबाबदारपणे टाकलेल्या मोकळ्या जागेत पावसाचं पाणी साचण्याची शक्यता आहे. अशा पध्दतीच्या टायर्समध्ये पाणी साचून मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू तापाच्या डासांची पैदास होते. त्यामुळं शहराच्या सार्वजनिक आरोग्यास बाधा येते. त्यामुळं अशा दुकानदारांवर आरोग्य विभागाच्या वतीनं कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे.