टोल संदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार असं प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरेंनी ठाण्यात येऊन अविनाश जाधवांना उपोषण मागे घ्यायला लावलं. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
political
वाढत्या पार्किंग समस्येला आवर घालण्यासाठी मैदानं आणि उद्यानांच्या खाली भूमिगत वाहनतळ निर्माण करावेत – आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्रयांकडे मागणी
एम.एम.आर. क्षेत्रामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने पार्किंगबाबतचे एकच धोरण आखल्यास वाहतुक कोंडी दूर होईल आणि अपघाताला आळा बसेल.
मतदार आहे का हे मी कधीच पाहत नाही – श्रीकांत शिंदे
माझ्याकडे मदत मागण्यासाठी आलेली व्यक्ती ही माझा मतदार आहे का हे मी कधीच पाहत नाही, आपल्या परीने जेवढी शक्य होईल तेवढी मदत सर्वांना केली जाते.
जिल्ह्यात शिवसेनेचा उमेदवार कोणता द्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक अध्यक्ष ठरवतील – श्रीकांत शिंदे
जिल्ह्यात शिवसेनेचा उमेदवार कोणता द्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक अध्यक्ष ठरवतील असे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.
केंद्र सरकार धर्मद्वेष आणि जाती द्वेष पसरवत आहे- जितेंद्र आव्हाड
-केंद्रातील मोदी सरकार हे एखाद्या विशिष्ट धर्म व जाती विरोधात द्वेष पसरवत आहे.-भाजप चे दिल्ली मधील खासदर रमेश बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.-नव्या लोकसभेत सुरुवातीलाच भाजप ने अत्यंत चुकीचा पायंडा निर्माण केला आहे.-एखाद्या खासदार बाबत इतके वाईट विधान करूनही लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी कोणतीही करावाई केलेली नाही.
19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे 24 तास सुरू ठेवाव्यात – जितेंंद्र आव्हाड
गणेशोत्सवाच्या काळात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. शिवाय नवसाला पावणार्या गणेशाची आराधना करण्यासाठी अनेक तास रांगेत असतात.
शिवसेनेकडून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ५६७ बसेस सोडण्यात येणार
शिवसेनेकडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यात आला आहे. कल्याण लोकसभेतून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ५६७ बसेस सोडण्यात येणार आहेत.
कळवा रूग्णालयाची क्षमता वाढवण्याची मनसेच्या अविनाश जाधवांची मागणी
कळवा हॉस्पिटल वर दुरुस्तीच्या नावाखाली केला जाणारा खर्च वाया जाणार असून या रूग्णालयाचीच क्षमता वाढवावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अविनाश जाधव यांनी केली आहे.
जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात यावा
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी आणि नागरिकांना योग्य पद्धतीने उपचार मिळावा यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचा आढावा घेण्यात यावा.
खासदार राजन विचारे यांची बदनामी करणारा व्हिडीओ प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा
खासदार राजन विचारे यांची बदनामी करणारा व्हिडीओ प्रकाशित केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या वतीने नौपाडा पोलीस स्थानकात धाव घेण्यात आली.