ठाण्यातील २२ गोविंदा पथकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
MNS
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंद दिघे यांच्या करिष्म्याला साद
ठाणे विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंद दिघे यांच्या करिष्म्याला साद घातल्याचं दिसत आहे.
राज ठाकरेंना नोटीस आल्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याची आत्महत्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवल्याच्या कारणावरून ठाण्यातील एका कार्यकर्त्यानं आत्महत्या केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली अंमलबजावणी संचलनालयानं दिलेल्या नोटीसीची होळी
अंमलबजावणी संचलनालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ दिलेली ठाणे बंदची हाक मागे घेतली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी १०० गाळे देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
शासनाबद्दल शेतक-यांचा रोष व्यक्त करण्यासाठी आणि आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीकरता १०० गाळे मिळावेत या आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज ठाण्यामध्ये जोरदार मोर्चा काढत शक्ती प्रदर्शन केलं.
शेतक-यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येत्या शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा
शेतक-यांच्या प्रती शासनाची अनास्था, शेतक-यांचं दु:ख आणि सरकारची बेफिकीरी चव्हाट्यावर आणण्याबरोबरच दुष्काळात होरपळणा-या आणि शेवटी मृत्यूला कवटाळणा-या शेतक-याला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे येत्या शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा नेला जाणार आहे.
ठाण्यात आमच्या लोकांनी चोपून आंबा खाल्ला -राज ठाकरेंचा भारतीय जनता पक्षाला टोला
अक्षयकुमारनं पंतप्रधानांना तुम्ही आंबा कापून खाता की चोखून असा प्रश्न विचारला होता. ठाण्यात मात्र आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना भारतीय जनता पक्षाला लगावला.
आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील वाद अद्यापही सुरू
विष्णूनगर मधील आंबा विक्री केंद्रावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील वाद अद्यापही सुरू असल्याचं दिसत आहे.
आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू – आनंद परांजपे
ठाणे महापालिका प्रशासनानं सत्ताधा-यांच्या हातचं बाहुलं होऊ नये, गोरगरिब शेतक-यांनी उत्पादित केलेला आंबा विकण्यासाठी पुन्हा स्टॉल उभारू न दिल्यास सर्व आंबा विक्रेत्यांना घेऊन पालिकेच्या दारातच आंबा विक्री केंद्र सुरू करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.