ठाणे विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आनंद दिघे यांच्या करिष्म्याला साद घातल्याचं दिसत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाणे शहर मतदारसंघातून ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळं शिवसैनिक निराश असल्याचं दिसत आहे. त्याचा लाभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उठवण्याचं ठरवलं आहे. मराठी मताच्या जोरावर आणि आनंद दिघे यांच्या करिष्म्यालाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं साद घातली आहे. अविनाश जाधव यांनी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच थेट शक्तीस्थळावर जाऊन आनंद दिघे यांचं दर्शन घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.