ठाण्यातील गोविंदा पथकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा

ठाण्यातील २२ गोविंदा पथकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघातून अविनाश जाधव आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणा-या जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील गोविंदा पथकांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पाठिंबा देणा-यांमध्ये शहरातील २२ गोविंदा पथकं असून यामुळं साधारणत: ५ ते ६ हजार युवकांचा पाठिंबा अविनाश जाधव यांना मिळेल असं यावेळी सांगण्यात आलं. दहीहंडी उत्सव जेव्हा अडचणीत आला तेव्हा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली. दहीहंडीवर आलेल्या निर्बंधांविरोधात अगदी उच्च न्यायालयापर्यंत लढाई नेण्यात आव्हाड यांनी मदत केली. आता हे दोघे निवडणूक लढवत असल्यामुळं त्यांना आम्ही पाठिंबा देत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading