मतदारांच्या सहाय्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत भर देण्यात येत आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी व्होटर्स हेल्पलाईन आणि दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी ही ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
collector
मतदानाचा टक्का वाढावा याकरिता मतदान जनजागृतीकरिता जिल्ह्यात दोन दिवस फिरणार रथ
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसंच मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं जिल्हा प्रशासन आणि ठाणे क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यामध्ये महामतदार जागृती रथ फिरवण्यात येणार आहे.
कालपर्यंत १५ उमेदवारांनी केले आपले उमेदवारी अर्ज दाखल
जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या १८ जागा असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत. कालपर्यंत १५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणा-यांवर कारवाईचा इशारा
निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश
विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक निरिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
मतदान यंत्रांच्या सरमिसळीकरणाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्यानं पार
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्यानं आज पार पडली.
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराला २८ लाख रूपये खर्च करण्याची मुभा
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराला २८ लाख रूपये खर्च करण्याची मुभा आहे. सर्व उमेदवारांनी या मर्यादेतच निवडणूक खर्च करावा असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं आहे.
भिवंडीमध्ये १० लाखांची रोकड भरारी पथकानं केली जप्त
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता पथकानं केलेल्या धडक कारवाईत १० लाखांची रोकड हस्तगत केली आहे.
पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुका होण्यासाठी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी
पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुका होण्यासाठी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा असं सांगून जिल्ह्यातील सर्व निवडणूक यंत्रणांनी समन्वयाचं काम करावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं.
आचारसंहिता भंग केल्यास कडक कारवाईचा जिल्हाधिका-यांचा इशारा
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.