जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या १८ जागा असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत. कालपर्यंत १५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे, भिवंडी पूर्वमध्ये अपक्ष मनोज गुळवी, अपक्ष नरूद्दिन अन्सारी, मुरबाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव, अंबरनाथमध्ये अपक्ष यतिन मोरे, उल्हासनगरमध्ये अपक्ष ज्ञानेश्वर लोखंडे, कल्याण पूर्वमध्ये अपक्ष बालाजी गायकवाड, संघर्ष सेनेचे हरिश्चंद्र पाटील, कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे सुभाष भोईर, कोपरी-पाचपाखाडीमध्ये आंबेडकराईट पार्टीच्या साधना शिंदे, कळवा-मुंब्रामध्ये अपक्ष फरहद शेख, बेलापूरमध्ये युवा जनकल्याण पक्षाचे अजय उपाध्याय आणि अपक्ष संतोष कांबळे यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. तर ऐरोली, ठाणे, मीरा-भाईंदर, डोंबिवली, कल्याण, भिवंडी पूर्व आणि शहापूर विधानसभा मतदारसंघातून एकाही उमेदवारानं आपला अर्ज दाखल केलेला नाही.