पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुका होण्यासाठी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी

पारदर्शी आणि निर्भय वातावरणात विधानसभा निवडणुका होण्यासाठी आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा असं सांगून जिल्ह्यातील सर्व निवडणूक यंत्रणांनी समन्वयाचं काम करावं असं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं. सर्व निवडणूक अधिकारी, पोलीस अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली त्यावेळी जिल्हाधिका-यांनी हे आवाहन केलं. शासकीय, सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेवर असणारी होर्डींग्ज काढून टाकावी, मतदारसंघांमध्ये तात्काळ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावे, भरारी पथकं, स्थायी निगराणी पथकं यांची निर्मिती करावी, स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्र यांची तपासणी करावी, कर्मचारी आणि अधिका-यांना प्रशिक्षण द्यावं आणि मागच्या चुका टाळून योग्य उपाययोजना करण्यावर भर देण्याचं आवाहन जिल्हाधिका-यांनी केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading