महापालिकेच्या पिसे उदंचण केंद्राच्या जॅकवेल मध्ये गाळ अडकल्याने पाण्याचा उपसा कार्यक्षमता कमी झाल्याने
दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता – सकाळपासून दोन तासात १०० मिमि पावसाची नोंद
ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे.
महापालिकेच्या इतिहासात प्रतमच बीएसयुपी प्रकल्पातंर्गत एकाचवेळी होणार २३८३ इतक्या विक्रमी सदनिकांचे वितरण
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बीएसयुपी प्रकल्पातंर्गत एकाचवेळी जवळपास २३८३ इतक्या विक्रमी सदनिकांचे वितरण या महिन्याअखेर प्रकल्प बाधितांसह दिव्यांगांना वितरित करण्याचा
महत्वाकांक्षी निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.
महसुल विभागातील कर्मचा-यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक
महसुल विभाग हा शासनाचा कणा असुन विभागातील अधिकारी,कर्मचारींनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी महसूल दिन
कार्यक्रमात बोलताना केले.
मँरेथाँन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसांनी सहकार्य करण्याची महापौरांची सूचना
रविवार 18 ऑगस्ट रोजी होत असलेल्या ठाणे महापौर वर्षा मँरेथाँनमध्ये सहभागी होणाऱया स्पर्धकांना स्पर्धेदरम्यानकोणत्याही प्रकारचा वाहतूकीचा अडथळा होवू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना
करण्यात याव्यात. त्याचप्रमाणे मँरेथाँन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसांनी सहकार्य करावे अशा सूचना महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिल्या.
भाषा समृध्द होण्यासाठी वाचन आवश्यक – नरेश म्हस्के
भाषेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणे जरी अवघड असले तरी समाजात वावरताना भाषा ही तितकीच महत्वाची आहे. भाषा समृध्द होण्यासाठी वाचन करणे आवश्यक असल्याचे सभागृह नेते नरेश
म्हस्के यांनी सांगीतले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून जलशुद्धीकरण यंत्र चोरीला
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जलशुद्धीकरण यंत्र चोरीला जाण्याचा प्रकार समोर आला आहे.
जिल्ह्यातील सत्ता ही बिल्डर आणि क्लस्टर धार्जीणी – वंचित बहुजन आघाडीचा आरोप
ठाणे जिल्ह्यातील सत्ता ही बिल्डर आणि क्लस्टर धार्जीणी आहे त्यामुळेच आदिवासी ,कोळी आणि आगरी यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत आणि सत्ताधारी बहुजनांच्या जमीन हक्कासाठी
काहीही करणार नाही तेव्हा असे हिंदुत्व आम्हाला नको ही इच्छा सर्व कोळी आगरी आदिवासी बांधवांमध्ये आहे. त्याची झलक येत्या विधानसभा निवडणूकीत ती दिसेल, असा इशारा आगरी कोळी
समाजाचे लढवय्ये नेते वंचित बहुजन आघाडी राज्य सचिव राजाराम पाटील यानी प्रस्थापित राजकीय नेत्यांना दिला आहे .
खेळाडूंची आवड जोपासणारी ठाणे ही एकमेव महापालिका – ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱया ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे यंदाचे हे 30 वर्षे असून ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. नागरी सुविधा देत असतानाच खेळाडूंची आवड
जोपासणारी ही एकमेव अशी ठाणे महापालिका असल्याचे गौरवोद्गार ज्येठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी काढले.