ठाणे जिल्ह्यातील सत्ता ही बिल्डर आणि क्लस्टर धार्जीणी आहे त्यामुळेच आदिवासी ,कोळी आणि आगरी यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत आणि सत्ताधारी बहुजनांच्या जमीन हक्कासाठी
काहीही करणार नाही तेव्हा असे हिंदुत्व आम्हाला नको ही इच्छा सर्व कोळी आगरी आदिवासी बांधवांमध्ये आहे. त्याची झलक येत्या विधानसभा निवडणूकीत ती दिसेल, असा इशारा आगरी कोळी
समाजाचे लढवय्ये नेते वंचित बहुजन आघाडी राज्य सचिव राजाराम पाटील यानी प्रस्थापित राजकीय नेत्यांना दिला आहे .ठाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जमीन हक्क परिषदेचे आयोजन
करण्यात आले होते. या परिषदेला संबोधीत करताना ते बोलत होते.जिल्हा आणि शहर पातळीवर क्लस्टर, एस आर ए योजने बाबत जनतेत अधिच आपली घरे दुकाने जातील ही भीति आहे. तसेच
एम आय डी सी च्या जमीनीवर हजारो जनतेची घरं आहेत. तर कोळी आगरी आदिवासी जनतेची पिढ्यां न पिढ्यां गावठाण आहेत. ह्या जमीनी लुटण्यासाठी विविध योजनेच्या नावाखाली जनतेला
फ़सविले जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर जमीन हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी वतीने ठाणे जिल्हा वतीने जमीन हक्क परिषद आयोजित केली गेली होती.यावेळी शास्त्रज्ञ आणि माजी कुलगुरु तसेच
व्हिबीए संसदीय मंडळ सदस्य डॉ अरुण सावंत यानी, भाजपा-सेना सरकारचे धोरण हे भूमिपुत्र जनतेच्या विरोधात आहे. सबंध कोस्टल प्रकल्प हा आगरी कोळी आणि आदिवासी लोकांना उध्वस्त
करणारा निसर्गाचे नाश करणारा असल्याचेत्यांनी सांगतिले. ह्या परिषदेत निर्वासित शिख समुदाय यानी देखील, आम्ही वंचित आहोत आमचा देखील जमिनिचा प्रश्न आहे,अशी व्यथा मांडत वंचित
बहुजन आघाडी सोबत राहणार असल्याची ग्वाही नेते सुरजितसिंग लभाणा यानी दिली. ह्या परिषदेत आगरी समाजाचे नेते चंद्रकांत वैती यांनी देखील जमीन हक्क मिळवण्यासाठी आगरी समाज
वंचित सोबत राहिल यांची खात्री दिली. या परिषदेत सर्वानुमते जमीन हक्कासाठी ठराव केला गेला तो शासनाकडे तात्काळ पाठविला जाणार असल्याची घोषणा राजाराम पाटील यानी केली.
ठाण्यातील दलित, आदिवासी, आगरी कोळी बांधवांच्या जमिनींवर बिल्डर लॉबीचा डोळा आहे. त्यातूनच क्लस्टर नावाचे भूत उभे केले आहे. मात्र, हे भूत आम्ही जमिनीत गाडल्याशिवाय शांत
बसणार नाही असा इशारा राजाराम पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत दिला.