ठाण्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. ठाण्यामध्ये काल रात्रीपासून तुफान पाऊस झाला असून या पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शासनाने कालच स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.जी मुलं शाळेत आली असतील त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात घेऊनच शाळा बंद करावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.ठाण्यामध्ये सकाळी साडेआठ वाजेपर्यंत या 24 तासात 106 मिलिमीटर पाऊस झाला असून जवळपास 25 हून अधिक ठिकाणी पाणी साचले याच्या तक्रारी आहेत.मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा ही धीम्या गतीने सुरू आहे. ठाणे रेल्वे स्थानकातही काही फलाटा पर्यंत पाणी आल्याचे दिसत आहे.