ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जलशुद्धीकरण यंत्र चोरीला जाण्याचा प्रकार समोर आला आहे. ठाणे पश्चिमेकडील कोर्ट नाका परिसरात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आहे.या कार्यालयाच्या
दुसऱ्या मजल्यावर ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालय आहे.या कार्यालयाबाहेरील व्हरांड्यात बसवण्यात आलेले पिण्याच्या पाण्यासाठीचे 4 हजार रुपये किमतीचे वॉटर प्युरिफायर यंत्र अज्ञात
चोरटयांनी पळवले.हा प्रकार 30 जुलै रोजी सायंकाळी 8 ते 31 जुलै सकाळी 10 वाजेपर्यंत घडला.अशी तक्रार ग्राहक तक्रार निवारण मंचचे प्रबंधक चंद्रकांत उगले यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात
केली आहे.