ठाण्यामध्ये गेले तीन दिवस पाऊस कोसळत असून गेल्या २४ तासात ठाण्यात ८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
बारवी धरणातून काल पाण्याचा विसर्ग झाल्यामुळं आजूबाजूचा परिसर जलमय
शहराबरोबरच ग्रामीण भागातही जोरदार पाऊस होत असल्यामुळं जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणं भरली असून अनेक धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. जोरदार पाऊस, त्यातच धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग यामुळं जिल्हा जलमय होऊन गेला आहे. बारवी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळं आजूबाजूची गावं पाण्याखाली गेली होती. कल्याणातही महापूर आला होता. कल्याणचे सर्व प्रवेशाचे मार्ग बंद झाले होते. ठाणे … Read more
बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळं दिवा पाण्याखाली
बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळं दिवा पाण्याखाली गेलं होतं.
जोरदार पावसामुळे जू गावात अडकलेल्या ५९ ग्रामस्थांची वायुदलाच्या सहकार्यानं सुटका
जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं.
पूरजन्य परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
गेले दोन दिवस झालेल्या तुफानी पावसात महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
शहापूर तालुक्यातील ४० गावांचा शहापूरशी संपर्क तुटला
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळं शहापूर तालुक्यातील ४० गावांचा शहापूरशी संपर्क तुटला होता.
जोरदार पावसामुळे यंदा प्रथमच गडकरी रंगायतनचा परिसरही जलमय
ठाण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे यंदा प्रथमच गडकरी रंगायतनचा परिसरही जलमय झाला होता. मात्र हा परिसर जलमय होण्यामध्ये निसर्गापेक्षा एक बांधकाम व्यावसायिक कारणीभूत ठरला. गडकरी रंगायतनच्या बाजूला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं कार्यालय असून त्या ठिकाणीच महापालिकेचं पंपिंग स्टेशन आहे. शहरातील पाणी या पंपिंग स्टेशनद्वारे खाडीमध्ये सोडले जाते. या पंपिंग स्टेशन समोरच नागरिक बिल्डरचं काम सुरू आहे. ज्येष्ठ … Read more
ठाण्यातील गेल्यावर्षीची सरासरी पावसानं ओलांडली
ठाण्यामध्ये गेले तीन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे गेल्यावर्षीच्या पावसाची सरासरी ओलांडली गेली आहे.
नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा
नागपंचमीचा सण आज साजरा झाला मात्र पर्यावरणवाद्यांच्या रेट्यामुळे नागपंचमी असल्याचं वातावरण अलिकडे कुठेही दिसतनाही. दिनदर्शिकेवरूनच नागपंचमी असल्याचं समजतं.
अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर
ठाणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे.