बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळं दिवा पाण्याखाली गेलं होतं. यामुळं जवळपास साडेआठ हजार लोकं या पाण्यात अडकली होती. याची माहिती मिळताच काल दिवसभरात टीडीआरएफ, सैन्यदल, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीनं ७ बोटींच्या सहाय्यानं साडेआठ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.