जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळं शहापूर तालुक्यातील ४० गावांचा शहापूरशी संपर्क तुटला होता. काल शहापूरमध्येही जोरदार पाऊस झाला. वाशिंद बोगद्यात पाणी गेलं होतं. तर भातसईचा पूलही बंद झाल्यानं २० गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. भातसा धरणाचे ५ दरवाजे अडीच मीटरनं उघडण्यात आल्यानं ग्रामीण भागातील नदी-नाल्यांना पूर आला होता. अनेक छोटे-मोठे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. शहापूर, आसनगाव, वाशिंद, कसारा, खर्डी बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी झालं होतं. सापेगावचा पूलही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.