ठाणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.