मुंबई महापालिकेनं ज्याप्रमाणे उद्यानं बंद केली त्याप्रमाणे ठाणे महापालिकेच्या सर्व उद्यानांमधील प्रवेशावर बंदी आणली आहे.
corona virus
ठाणे महापालिका कार्यालयात अभ्यागतांना प्रवेशबंदी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेनं काही मार्गदर्शक तत्वं जारी केली असून महापालिका मुख्यालय तसंच प्रभाग समितीमध्ये येणा-या अभ्यागतांना पुढील आदेश होईपर्यंत प्रवेश बंदी केली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्र्यांतर्फे हँड सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्र्यांतर्फे हँड सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात आलं.
छत्रपती शिवाजी रूग्णालयातील विलगीकरण कक्षाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन केली पाहणी
छत्रपती शिवाजी रूग्णालयातील विलगीकरण कक्षाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.
गोदरेज कंपनीनं महापौरांकडे केले १ लाख हँडवॉश सुपुर्द
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा सामना करण्यासाठी सतत हात हॅण्डवॉशने स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी गोदरेज कंपनीच्या प्रोटेक्ट इंडिया मूव्हमेंटने पुढाकार घेतला असून आज त्यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे पालिका कर्मचाऱ्यांसाठी 1 लाख हॅण्डवॉश सुपुर्द केले.
राज्यातील शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील कोचिंग क्लासेसही ३१ मार्च पर्यंत बंद
कोरोना व्हायरसचा प्रसार थांबावा यासाठी राज्यातील शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर आता ठाण्यातील कोचिंग क्लासेसही ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
ठाणे महानगरपालिका येथे नियंत्रण कक्ष स्थापन – २४ तास डॉक्टरांची नियुक्ती
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे महानगरपालिका येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील यंदाची नववर्ष स्वागतयात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील यंदाची नववर्ष स्वागतयात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी श्रीनगर येथे २५ खाटांची तर रोझा गार्डनिया येथे १५ खाटांची विलगीकरण सुविधा
कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगानं महापालिकेनं या व्हायरसचा सामना करण्यासाठी श्रीनगर येथे २५ खाटांची तर रोझा गार्डनिया येथे १५ खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण केली आहे.
अनावश्यक गर्दी टाळण्याचं जिल्हाधिका-यांचं आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणा दक्ष असून नागरिकांनी भयभीत न होता सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी असं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केलं आहे.