ओरिगामी ठाणे ट्रस्टतर्फे ट्रस्टच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त ओरिगामी कलेमध्ये रस वाढावा यासाठी ओरिगामी प्रदर्शन आणि ओरिगामी विषयक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.
ठाणे रेल्वे स्थानक ते गोखले रोड परिसरातील दुकानांमध्ये स्वच्छता स्पर्धेचं आयोजन
गांधी जयंतीचं औचित्य साधून ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ठाणे नॉर्थ तसंच ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबईत महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणा-या टोळीस अटक
बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीचं आमिष दाखवून बेरोजगार युवकांना लाखो रूपयांचा गंडा घालणा-या टोळीस गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे.
ठाणे कारागृहातील क्रांतीकारकांना फाशी दिलेली जागा ठराविक दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव
देशातील महान क्रांतीकारकांना ज्या ठिकाणी फाशी देण्यात आलं ती जागा काही महत्वाच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचा प्रस्ताव आहे.
ठाण्यातील दोघांचा ठाणे भूषण, ९६ जणांचा ठाणे गुणिजन तर २० जणांचा ठाणे गौरव पुरस्कारानं सन्मान.
ठाणे महापालिकेच्या ३६व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून ठाण्याच्या विकासात महत्वाचं योगदान देणा-या अनेक नामवंत व्यक्तींना ठाणे भूषण, ठाणे गौरव आणि ठाणे गुणीजन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धपुतळा उभारण्याबाबत पालिका उदासिन असल्याबद्दल आमदार संजय केळकर यांची नाराजी
राष्ट्र उभारणीसाठी संरक्षक यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे देशाचे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचा अर्धपुतळा बसवण्यास महापालिकेला रस नसल्याबद्दल आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रेल्वे बोर्डाच्या मुंबई विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी पत्रकार अमोल कदम यांची नियुक्ती
रेल्वे बोर्डाच्या मुंबई विभागीय सल्लागार समितीच्या सदस्य पदी ठाण्यातील पत्रकार अमोल कदम यांची नियुक्ती झाली आहे.
सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं मूक धरणं आंदोलन
भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि शांततेच्या तत्वांना हरताळ फासला जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं मूक धरणं आंदोलन केलं.
नि.गो. पंडीतराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा पोवळेला प्रथम क्रमांक
नि.गो. पंडीतराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा पोवळे हिनं प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयीन क्षेत्रात अत्यंत मानाची समजली जाणारी नि. गो. पंडीतराव ढाल पटकावली आहे.
नवरात्रीतील रंगांबाबत कोणत्याही धर्मग्रंथात उल्लेख नाही – दा. कृ. सोमण
नवरात्रीमध्ये वापरल्या जाणा-या रंगांसंबंधी कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सांगितलेले नाही. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत येणा-या वारावर हे रंग अवलंबून असतात. नवरात्रात याच रंगाची वस्त्रं नेसली म्हणजे जास्त पुण्य मिळते असंही नाही असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.