ठाणेकरांनी अलीकडेच प्राच्य विद्या अभ्यास संस्थेत शिल्प, चित्र आणि वाद्य असा त्रिवेणी कलाविष्कार अनुभवला.
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शासकीय कामकाज विस्कळीत
जुनी निवृत्ती योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे शासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे.
कोपरी विभागामध्ये झालेल्या विकास कामांची आणि गैरव्यवहाराची चौकशी करण्याची आमदार संजय केळकरांची विधान सभेत मागणी
ठाणे महापालिकेच्या कोपरी विभागामध्ये झालेल्या विकास कामांची आणि त्या कामांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांची विधानसभेत केली आहे.
कळवा येथे शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन
गणेशोत्सवासह शिमगाोत्सव हा कोकणी चाकरमान्यांचा अत्यंत आत्मियतेचा सण. या सणासाठी ठाणे- मुंबईतील अनेक चाकरमानी आवर्जुन गावी जात असतात. मात्र, ज्यांना काही कारणांनी गावी जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून कळवा येथे शिमगोत्सवासह भव्य अशा पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
अनवाणी पायांना मिळाला प्रसाद चिकीत्सा संस्थेचा आधार
गणेश पुरीतील गुरुदेव सिद्ध पीठ प्रेरित प्रसाद चिकीत्सा संस्थेच्या वतीने गणेशपुरी परिसरतील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना पादत्राणे वाटण्यात आली.
राज्यात पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिफारशीला अनुसरून राज्यात पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम सुरू आहे.
नरेश म्हस्के ठाण्यातील पोलीसांना सांगतील त्यांच्यावरच ठाण्यात गुन्हा दाखल होतो – अजय जया
गेले अनेक दिवस चालु असलेल्या शिवसेनेच्या दोन गटांत सुरू असलेल्या वादात आता ठाण्यात एका सामाजिक कार्यकर्त्याने ऊडी
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रावर गोंधळ ; उपचार वेळेत होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त
कल्याण डोंबिवली परिसरात ही बदलत्या हवामानामुळे ताप आणि सर्दी खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून कल्याण डोंबिवली परीसरातील अनेक आरोग्य केंद्र बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र पालिका प्रशासन यावर गंभीर नसल्याचे दिसून येत असून रुग्णांना रांगेत उभे करून आपल्या मर्जी प्रमाणे केंद्र उघडत आणि बंद करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा एककलमी कार्यक्रम – आनंद परांजपे
राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे. मात्रं मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या मंचावरच जन्मठेप झालेले गुंड दिसत असतात.
मध्य रेल्वे आरपीएफ श्वान पथक- मध्य रेल्वेचे कॅनाईन हिरो
उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे आधीच धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी, रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांची सुरक्षा याला मध्य रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रेल्वे मालमत्तेच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेले रेल्वे संरक्षण दल सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत करण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचलत आहे आणि त्यापैकी एक म्हणजे श्वान पथक आहे. मध्य … Read more