विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात काल ७३वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
Social
पंडीत किंवा उस्तादांनी नव्हे, तर संस्कारानी घडवले – पुरुषोत्तम बेर्डे
स्त्री समानतेचा विषय हा चर्चेचा नसून कृतीचा – निलम गो-हे
स्त्रियांनी राजकारणात आपले नेतृत्व सिद्ध करत असताना स्वतःचा कृती आराखडा तयार करावा. स्त्री समानतेचा विषय हा चर्चेचा नसून कृती करण्याचा आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी स्त्रियांवर अन्याय होतो त्या ठिकाणी त्यांच्या मागे ठामपणे उभे रहावे. स्त्रियांच्या न्यायाचे दूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले.
सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी घरात सायबर संस्कृती जोपासण्याचा प्रशांत माळींचा सल्ला
सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याकरिता आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात सायबर सेफ संस्कृती जपावी लागेल असा सल्ला सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी दिला.
जगाचे संविधान बनवण्याची वेळ आली तर ज्ञानेश्वरांचं पसायदान पुरेसं – सुनिल देवधर
जगाचे संविधान बनवण्याची वेळ आली तर कमिटी स्थापन करण्याची गरज नाही. संत ज्ञानेश्वरांचे पसायदानच पुरेसे आहे, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस सुनिल देवधर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचे हिंदुत्व विश्वव्यापी असल्याचे स्पष्ट केले.
पत्रकार प्रशांत सिनकर यांना जीवनगौरव पुरस्कार
पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत सिनकर यांना साप्ताहिक ठाणे नवादूत यांनी आयोजित केलेल्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती सन्मान सोहळ्यात पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धन जनजागृती याबाबत केलेल्या कार्याकरीता “जीवन गौरव” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1971 च्या युध्दात सहभागी माजी सैनिकांचा ब्रम्हाळा उद्यानात अनोखा सत्कार
1971 साल हे भारतवर्षाच्या आयुष्यातलं एक ऐतिहासिक वर्ष आहे. ह्याच वर्षी भारताने पाकिस्तानशी झालेल्या युध्दात गौरवशाली विजय मिळवला आणि पाकिस्तानची दोन शकलं केली.
वंचितांचा रंगमंच हा किंचितांचा न राहता संचितांचा झाला आहे – विजू माने यांचे गौरवोद्गगार
आज वंचितांच्या रंगमंचावर मुले ज्या मुक्तपणे व्यक्त झाली त्या बद्दल रत्नाकर मतकरी सरांनी ज्या द्रष्टेपणाने या रंगमंचाची बीजे रोवली त्याला मनापासून सलाम! आज मला खात्री पटली की हा रंगमंच वंचितांचा पासून किंचितांचा होऊन आता तो संचितांचा झाला आहे. असे कौतुकाचे शब्द सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक विजू माने यांनी आज वंचितांच्या रंगमंचावर सादर झालेला नाट्यजल्लोष बघून काढले. … Read more
ठाण्यातील चर्मकार समाजाचं विविध मागण्यांसाठी महापालिका मुख्यालयासमोर चूल-मूल आंदोलन
ठाण्यातील चर्मकारांनी विविध मागण्या पूर्ण होत नसल्याच्या निषेधार्थ ठाणे महापालिका मुख्यालयासमोर चूल-मूल आंदोलन केलं. चर्मकारांच्या स्टॉलवर वारंवार कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं.
ग्राममंगल आणि आंतरभारतीतर्फे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांचा सत्कार
राज्यातील बहुसंख्य खाजगी शाळा तसेच इंग्रजी शाळा विद्यार्थ्यांना कालबाह्य शिक्षणाचे धडे देत आहेत. याउलट जिल्हा परिषदेच्या हजारो शाळांमधून ग्रामीण भागातील लाखो मुलांपर्यंत प्रयोगशील आणि रचनावादी शिक्षण पोहोचले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे यांनी ठाण्यात बोलताना केले.