ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होईल असा दावा काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.
vidhansabha election
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ३७ उमेदवारांची माघार – १८ जागांसाठी २१४ उमेदवार रिंगणात
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये ३७ उमेदवारांनी माघार घेतली आहे.
ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या माघारीमुळे निवडणुकीतील चुरस वाढली
ठाणे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुहास देसाई यांनी माघार घेतली आहे.
जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, प्रहसनातून केले मतदानाचे आवाहन
मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदानाला चला हो दादा, मतदानाला चला, कर्तव्याची जाण, करा मतदान अशी साद घालत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य, प्रहसनातून मतदानाचे मतदारांना आवाहन केले.
१८ विधानसभा मतदारसंघासाठी ३०० उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रं दाखल – २२५ उमेदवार वैध
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघासाठी ३०० उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रं दाखल केली असून त्यापैकी २२५ उमेदवार वैध ठरले आहेत. तर ३८ उमेदवार अवैध ठरले आहेत.
मतदानाचा टक्का वाढावा याकरिता मतदान जनजागृतीकरिता जिल्ह्यात दोन दिवस फिरणार रथ
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी तसंच मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशानं जिल्हा प्रशासन आणि ठाणे क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यामध्ये महामतदार जागृती रथ फिरवण्यात येणार आहे.
कालपर्यंत १५ उमेदवारांनी केले आपले उमेदवारी अर्ज दाखल
जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या १८ जागा असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहेत. कालपर्यंत १५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणा-यांवर कारवाईचा इशारा
निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश
विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक निरिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
मतदान यंत्रांच्या सरमिसळीकरणाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्यानं पार
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्यानं आज पार पडली.