पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि काळजीपूर्वक काम करावे तसेच नागरिकांना वेळीच सुचना मिळतील याची काळजी घ्यावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं.
Cm
शासन पालिकांच्या पाठीशी, पण हलगर्जी नको – मुख्यमंत्री
शासन पालिकांच्या पाठीशी पण कोरोना रोखण्यात हलगर्जी नको. नागरिकांनी देखील आरोग्याचे सर्व नियम काटेकोरपणे पालन तितकेच गरजेचे आहे असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पालिकांनी कोरोना दक्षता समित्यांच्या माध्यमातून हा लढा अधिक तीव्र करावा असे सांगितले.
कोरोनाची एकांगी लढाई लढू नका – मुख्यमंत्री
जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्या चिंताजनक असून कोरोनाची एकांगी लढाई लढू नका, यामध्ये शहरांतील नागरिक, स्वयंसेवी संस्थाना यात सहभागी करून घ्या जेणेकरून या साथीवर नियंत्रण मिळविणे सोपे जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विरोधक सत्तेवर कसे यायचे याचा विचार करण्याऐवजी विरोधी पक्षामध्ये कसे यायचे अशी चिंता करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा टोला
या निवडणुकीत कोणत्याही प्रकारची चुरस राहिलेली नसून विरोधक सत्तेवर कसे यायचे याचा विचार करण्याऐवजी विरोधी पक्षामध्ये कसे यायचे अशी चिंता करत असल्याचा टोला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांची ठाण्यातील सभा ठरली गैरसोयीची
भारतीय जनता पक्षाचे ठाणे विधानसभेचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची होणारी सभा ही ठाणेकरांच्या दृष्टीनं गैरसोयीचीच ठरली आहे.
सीकेपी बँक पुनर्जिवित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
सीकेपी बँकेचं पुनर्जीवन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
शहापूर आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
भावली धरणातील पाणी शहापूर आणि परिसराला देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
भूकंपग्रस्तांच्या सहाय्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही – मुख्यमंत्री
भूकंपग्रस्तांच्या सहाय्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
नगररचना विभाग हा नियंत्रक म्हणून नव्हे तर प्रमोटर म्हणून काम करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इन्फ्रास्ट्रक्चर अपॉर्च्युनिटीज् एन्टरटेनमेंट यांचे विकेंद्रीकरण करून लहान लहान शहरं विकसित झाली पाहिजेत. यावर भर देताना नागरीकरणाची नवी तत्वं अंमलात आणून नगर नियोजनात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला जाईल असे विचार मुख्यमंत्र्यांनी आज व्यक्त केले.
कल्याण ते बदलापूर मेट्रोची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई आणि महानगर क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी आगामी काळात जलवाहतुकीवर भर दिला जाणार असून या संदर्भातील एक विस्तृत जल वाहतूक आराखड्यास लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.