ठाणे लोकसभा मतदारसंघामधील मतमोजणी करण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार असून हा बंदोबस्त त्रिस्तरीय राहणार आहे.
loksabha election
मतमोजणी दरम्यान विधानसभा क्षेत्रानिहाय करण्यात आलेल्या विविध रंगांच्या वापरामुळे मतमोजणी अधिक पारदर्शक
ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या होत असून ही मतमोजणी पूर्णत: पारदर्शक रहावी यासाठी प्रथमच वेगवेगळ्या रंगांचा वापर करण्यात आला आहे. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती यायला लागणार किमान १२ तास
ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची जय्यत तयारी पूर्ण झाली असून ठाणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल हाती यायला साधारणत: १२ तास लागतील अशी माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील मतदानात शहरापेक्षा ग्रामीण महिलांचा अधिक सहभाग
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात झालेल्या मतदानात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील महिलांनी अधिक मतदान केलं आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघाची मतदान यंत्रं वेळेत न पोहचल्याप्रकरणी शिवसेना चौकशीची मागणी करणार
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या जवळपास २४ तास उलटल्यानंतरही सावळाराम क्रीडा संकुलात न पोहचल्यामुळं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना करणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात ४५.२८ टक्के मतदान
लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानात कल्याण लोकसभा मतदारसंघात ४५.२८ टक्के मतदान झालं आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी मतदान
जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न होऊनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घटला आहे.
भिवंडी मतदारसंघात गेल्या २ निवडणुकांपेक्षा यंदा मतदानात वाढ
जिल्ह्यातील ३ मतदारसंघांपैकी भिवंडी मतदारसंघात गेल्या २ निवडणुकांपेक्षा यंदा मतदानात वाढ झाल्याचं दिसत आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांवर मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे पाणी फिरलं
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनानं मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करूनही मतदानाच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे काही अंशी या प्रयत्नांवर पाणी फिरलं.
मतदार याद्यांमधील गोंधळाची जबाबदारी निवडणूक आयोगाला घ्यावीच लागेल – आमदार जितेंद्र आव्हाड
मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदान यंत्रामधील बिघाड यामुळं २० टक्के मतदार मतदानापासून वंचित राहिले आहेत. नागरिकांच्या राष्ट्रीय अधिकारापासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम निवडणूक आयोगानं केलं असून निवडणूक आयोगाला जाब कोण विचारणार असा प्रश्न आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.