लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या मतदानात कल्याण लोकसभा मतदारसंघात ४५.२८ टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघात झालेलं हे सर्वात कमी मतदान आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा असे विधानसभेचे ६ मतदारसंघ येतात. या ६ मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ४७.४७ टक्के मतदान अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात तर सर्वात कमी म्हणजे ४२.११ टक्के मतदान कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात झालं आहे. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात ४८.१०, डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ४२.२७, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ४५.६९ तर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात ४७.१४ टक्के मतदान झालं आहे.