मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दुचाकी लांबवणा-या नासीर खान या चोरट्याला कासारवडवली पोलीसांनी अटक केली आहे.
ठाणे पूर्वतील गणसिध्दी मित्रमंडळाचं अनोख्या पध्दतीनं गणपती विसर्जन
ठाणे पूर्वतील गणसिध्दी मित्रमंडळानं अनोख्या पध्दतीनं गणपती विसर्जन केलं.
महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात पोलीसांना यश
महामार्गावर दरोडा टाकून वाहन चालकास लुटणा-या ८ जणांच्या टोळीचा छडा लावण्यात ठाणे गुन्हे शाखा युनिट १ ला यश आलं असून ही टोळी कसायाला जनावरं विकण्यासाठी जनावरं देखील चोरून विकत असल्याचं उघडकीस आलं आहे.
ठाण्यामध्ये ७५० सार्वजनिक तर ३१ हजार ७१६ घरगुती गणपतींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात ठाण्यामध्ये भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या श्री गणेशाला निरोप देण्यात आला.
निर्माल्य खतासाठी देण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाल्यानं ठाण्याच्या खाडीत पहायला मिळालं आकाशाचं प्रतिबिंब
ठाण्याची खाडी हळूहळू प्रदूषणमुक्त होत असून निर्माल्य विरहीत ठाणे खाडीमध्ये चक्क प्रतिबिंब दिसू लागलं आहे. वाहत्या पाण्यामध्येच निर्माल्याचं विसर्जन करण्याचा अनेकांचा अट्टाहास असला तरी ठाणे खाडीत आपल्या निर्माल्यामुळं प्रदूषण वाढू नये याची काळजी ठाणेकर घेत आहेत
जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी
गणेशोत्सवामध्ये धर्मविरोधी आणि अशास्त्रीय संकल्पना राबवण्याऐवजी जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.
ठाण्यातील टाऊन हॉल अधिक आधुनिक आणि उपयोगी होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिका-यांचे प्रयत्न
ठाण्यातील बहुचर्चित टाऊन हॉल आता अजून आधुनिक आणि उपयोगी होईल अशात-हेनं विकसित केला जाणार आहे.
कृत्रिम तलावातील शुध्द पाण्यातच गणेश विसर्जन करणं योग्य – दा. कृ. सोमण
कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यास विरोध होत असला तरी प्रदूषित पाण्यापेक्षा कृत्रिम तलावातील शुध्द पाण्यातच गणेश विसर्जन करणं योग्य होईल असं मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केलं आहे.
उल्हासनगरमध्ये आंबवणे कुटुंबियांच्या घरी गेल्या २० वर्षांपासून पर्यावरण स्नेही गणेशोत्सव
सण उत्सव म्हणजे घरातलं चैतन्य. यानिमित्तानं एकमेकांकडे जाणं येणं होतं. भेट होते. पण ही भेट केवळ अवांतर गप्पात सिमित न राहता ती समाज बदलाचं माध्यम ठरावं या विचारानं प्रेरीत होऊन एका लहानशा कुटुंबानं गेल्या २० वर्षापासून पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाचा अवलंब केला आहे.
गणेशोत्सवातील सजावटीमध्येही समूह विकास योजनेचं प्रतिबिंब
ठाण्यामध्ये समूह विकास योजना वादग्रस्त ठरली असताना गणेशोत्सवातील सजावटीमध्येही समूह विकास योजनेचं प्रतिबिंब उमटलं आहे.